IMD Mansoon Alert: निसर्गाच्या अनिश्चिततेसमोर मानवी सामर्थ्य कधीच टिकाव धरू शकत नाही. अशातच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांवर चक्रीवादळाची सावली पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अवकाळी पावसाचा फटका
जोरदार पावसामुळे केवळ शेतकरी समाजालच, नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना ही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. पावसाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवस राज्यावर मुसळधार पावसाची सावली पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चक्रीवादळाची निर्मिती IMD Mansoon Alert
हवामान विभागाने नवीन दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत, चक्रीवादळाची निर्मिती होत आहेत. या चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMD Mansoon Alert
या तारखेला होणार महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; पहा सविस्तर हवामान अंदाज!
किनारपट्टीवर मोठा संकट
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, आणि पश्चिम बंगाल, व आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांच्या किनारपट्टी प्रदेशांत मोठ्या हवामान बदलाची ही शक्यता आहेत. ताशी ७० किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकणार असल्याने, या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रावरील परिणाम
महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास, येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात परिणाम राज्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या काळात राज्यात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत, असा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. IMD Mansoon Alert
कोकणातील परिस्थिती
दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.