PM kisan: केंद्र सरकारने पिएम किसान योजना सुरू करून ५ वर्षे पूर्ण झालेली आहे. या योजनेत काही बदल करावेत तसेच PM किसान योजनेच्या निधीची रक्कम वाढवावी अशी प्रकारची मागणी केली जाते आहे. ५ वर्षांत महागाई मध्ये मोठी वाढ झालेली असून PM किसान योजनेच्या निधीमध्ये मोठी वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसते आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात PM किसान योजनेबाबत नवीन बदलासह निधीमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेलीआहे. (Pm kisan 18’instolment date)
काही कृषीतज्ञांनी PM किसान योजनेची मदत हि एकरी असावी तर शेतकरी नेते, कृषी उद्योगाचे प्रतिनिधी आणि शेतकरी यांनी कृषीमंत्र्याकडे pm किसान निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी केलेली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पिएम किसान योजनेत 2000 रूपयांची वाढ करु शकते अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. (Pm kisan news)
लाडका भाऊ योजना: या तरुणांना दरमहा १० हजार मिळणार; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! Mukhymantri Ladka Bhau Yojana
लोकसभा निवडणुकीआधी pm किसान योजनेची रक्कम वाढणार अशा बातम्या social media तसेच काही केंद्रीय मंत्री यांच्याकडून वर्तवण्यात येत होती. परंतु अर्थसंकल्पात सरकार निर्णय घेऊ शकते. अशा प्रकारची बातमी पुढे येत आहे. pm किसान योजनेचा निधी किती वाढणार याबाबत अनेकांची वेगवेगळी मते पुढे आलेली आहेत. शेतकऱ्यांकडून सन्मान निधीमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी होत आहे. परंतु सरकार दोन किंवा तीन हजार रुपयांची वाढ करणार असल्याची बातमी देखील येत आहे. परंतु याविषयी सरकार किती रुपयांची वाढ करते हे प्रत्यक्ष आपल्याला अर्थसंकल्पांमध्येच पाहायला मिळणार आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असल्याची पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पा आधी शेतकरी नेते, कृषी उद्योग यामध्ये बैठका झालेल्या आहेत या बैठकांत pm किसान योजनेचा निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केलेली आहे. सरकार कडून pm किसान योजनेत 2000 रूपयांची वाढ करण्याचे अंदाज लावले जात आहे.
नारीशक्ती दुत ॲप सुरू: लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाइन कसा करावा mukhymantri Ladki bahin yojana online apply
pm किसान योजनेत वाढ होणार आहेत अशी चर्चा, बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. परंतु अर्थसंकल्पात जेव्हा निर्णय होईल. तोपर्यंत यामध्ये स्पष्टपणे समाजणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.