3 जानेवारी पर्यंत व्याजासह पिक विमा जमा करा; पिक विमा कंपनीने कृषी मंत्र्यांचे आदेश ( Pik Vima Update)

Pik Vima Update ; महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना त्यांचे प्रलंबित फळ पिक विम्याची रक्कम ही लवकरच मिळणार आहे. हा विमा खराब हवामानामुळे झालेले नुकसानासाठी देण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ 3 जानेवारी पर्यंत विम्याची रक्कम बँक खाते मध्ये जमा करण्याचे आधी देण्यात आलेले आहेत.

रायगड जिल्ह्यामधील सुमारे १९५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजनेच्या अंतर्गत त्यांचा फळबागांचा विमा काढलेला होता. मात्र पिक विमा कंपन्यांकडून केवळ तीन हजार पाचशे शेतकऱ्यांना दाव्याचे पैसे मिळाले होते. उर्वरित चार हजार शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे या विम्याची रक्कम मिळण्यास अनेक प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्यांना कोणतेही पैसे मिळालेले नव्हते.

20231229 145849 3 जानेवारी पर्यंत व्याजासह पिक विमा जमा करा; पिक विमा कंपनीने कृषी मंत्र्यांचे आदेश ( Pik Vima Update)

हे पण महत्त्वाचं आहे 👉 Bank Account Minimum Balance Rule 2024 : 1 जानेवारी पासून फक्त एवढी रक्कम बँक खात्यात ठेवावी लागणार, RBI चा नवा नियम केला जाहीर ?

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या विम्याच्या रकमेची मागणीसाठी अनेक निदर्शने केलेली होती. यावर तोडगा काढण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालय मंत्री अदिती तटकरे यांनी कृषिमंत्री यांची भेट घेऊन त्यांना विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन याविषयी सर्व माहिती देण्यात आलेली होती. यानंतरच विमा कंपन्यांना 3 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

आता उरलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे विम्याची रक्कम ही व्याजासह मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच हे 3 जानेवारी 2024 पूर्वी उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे सुमारे 27 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 जानेवारी पूर्वी जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी जाहीर केलेली आहे.

महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! | Maharashtra New Districts List Announced

रायगड जिल्ह्यामधील फळ पिक विम्याचा प्रश्न हा आता मार्गी लागलेला आहे असे दिसत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आंबा काजू तसेच नारळाच्या भागांचा देखील विमा काढलेला परंतु कागदपत्रांच्या अभावामुळे तांत्रिक कारण तसेच अनेक अडचणीमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विमा मिळण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. आता हा प्रश्न मार्गी लावण कृषी मंत्र्यांनी तात्काळ कंपन्यातील जुनी विमा हस्तांतरित करण्याच्या आधी दिलेल्या असल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे. आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील मिळालेली आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360